उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा..
मुंबई, दि.२५ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. जैन धर्मियांचे तीर्थंकर भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला. प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवले. विश्वकल्याणाचा ‘जगा आणि जगू द्या’ हा महामंत्र दिला. माणूस जन्माने नाही, तर कामाने मोठा बनतो, ही शिकवण देऊन समाजातील वर्णवर्चस्ववादाला तिलांजली दिली. सत्य आणि अहिंसेला समर्पित केलेले भगवान महावीर यांचे जीवन आपल्याला विचारांची समृद्धता देते. शांतता, अहिंसा, बंधुत्वाच्या माध्यमातूनच जगाचे कल्याण होऊ शकते, हा त्यांचा विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा
चित्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
चित्र
नवजात बाळांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी संकल्पना; 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स' कडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
चित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र