भिवंडी आदिवासी समाज बांधव लसीकरणा पासून काढतात पळ, आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील जनजागृती साठी गाव पाड्या वर ।
भिवंडी आदिवासी समाज बांधव लसीकरणा पासून काढतात पळ, आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील जनजागृती साठी गाव पाड्या वर 

     कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण हा एकमेव आधार या पासून बचाव करण्यासाठी समोर दिसत असताना शहरात लस उपलब्ध नसल्याने ओरड होत आहेच परंतु शहरातील नागरीक ग्रामीण लसीकरण  केंद्रावर गर्दी करीत असल्याचा अनुभव येत असतानाच लसीकरण करण्यासाठी गावात कोणी येईल या भीतीने गावा बाहेरील जंगलात दिवसभर लपून बसणारे सुध्दा आढळून येतात .ते ही ठाणे जिल्ह्या पासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाड्यां वरील हे वास्तव विदारक आहे .
          लसीकरण करण्यासाठी ची ऑनलाईन पद्धती ग्रामीण अशिक्षित जनतेला समजत नसल्याने ग्रामीण भागात ऑफलाईन लसीकरण व्हावे अशी मागणी वाढत असतानाच आदिवासी समाज आज ही कपोलकल्पित भीतीने या लसीकरणा पासून दूर पळत असल्याची आकडेवारी समोर आल्यावर जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांनी आदिवासी विकास क्षेत्र कार्यक्षेत्रात येणाऱ्या चिंबी पाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंघे यांसोबत भेट देत तेथील लसीकरणाची माहिती करून घेत या परिसरातील खडकी बुद्रुक,आमराई ,
कुंभारपाड ,चिंबी पाडा ,बालखडी , पिंपळशेत ,म्हसकर पाडा या आदिवासी पाड्यांना भेटी देऊन तेथील बायबापड्यां सह जमिनीवर बैठक मारून त्यांची समजूत काढली .या भेटी प्रसंगी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य प्रकाश तलविरे, शिवसेना पदाधिकारी दीपक पाटील ,संदीप पाटील, चक्रधारी पाटील ,राजेंद्र काबाडी ,शेखर फरमन ,राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते .
          आज ही ग्रामीण भागातील  आदिवासी समाज आज ही लसीकरणा पासून लांब पळत आहे नव्हेच तर अनेक पाड्या वस्त्यांवरील आदिवासी समाज बांधव सकाळी लसीकरणा साठी पकडून घेऊन जातील म्हणुन जंगलात पळून जातात  ,ही लस घेतली की आपण मरणार ,आपल्याला इतर आजार जडतील ,लस द्यायला घेऊन जातील आणि इतर अवयव काढून घेतली या कपोलकल्पित भीतीने या अशिक्षित समाज बांधवांच्या मनात घर केले आहे .त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागात आज ही लसीकरण अत्यल्प झाले असून त्यामध्ये आदिवासी समाजाचा टक्का नगण्य आहे .
          आपण शहरी भागात राहणारे लसीकरणा साठी धावपळ करीत असताना ग्रामीण भागातील आदिवासी समाज लसीकरणा पासून दूर पळत आहे .त्यासाठी शासन प्रशासन लोकप्रतिनिधी समाजसेवी संस्था सुशिक्षित समाज घटक या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून या समाजाला लसीकरण सुरक्षित व आपल्या आरोग्य साठी आवश्यक असल्याचा विश्वास या समाजाला देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुंदन पाटील यांनी केले आहे .समाजातील शेवटच्या घटका पर्यंत लसीकरण पोहचविणे हे ध्येय जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग यांचे असून सजमतील काही घटक लसीकरणा पासून लांब पळत असले तरी त्यासाठी जनजागृती करून त्यांचे मन वळविले जेल अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंघे यांनी दिली आहे .
          आम्ही दिवसभर शेतात रानात काबाडकष्ट करत असून कोरोना ने आमच्या पाड्यात अज्जन शिरकाव केला नाही आम्हाला कोणता आजार नाही मग आम्ही लस कशाला घ्यायची असा सवाल उपस्थित करीत ज्यांना गरज आहे त्यांना लस द्या असा प्रतिप्रश्न जनजागृती करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रखमाबाई या महिलेने केला .एकूणच लसीकरण समाजाच्या शेवटच्या घटक पर्यंत घेऊन जाण्यासाठी या समाजातील लसी बाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी शासन प्रशासन यांना अजून बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे एवढे नक्की.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र